पाकिस्तानकडून भारतात १५ शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न   

 

पाकच्या कुरापती सुरूच
 
दिल्ली : 'ऑपरेशन सिंदूर' नंतर सीमेवरील तणाव हा वाढला आहे. पाकिस्तानकडून सीमा भागात गोळीबार केला जात आहे. भारतीय लष्कराने सीमा भागातील गावे रिकामी केली आहेत. पाकच्या कुरापती या कमी होण्याचे नाव घेत नाहीत. पाकिस्तानकडून भारताच्या १५ शहरांमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
 
भारताचे ऑपरेशन 'सिंदूर' हे अजूनही सुरूच आहे. भारतातील १५ शहरांमध्ये हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारताकडून हाणून पाडण्यात आला आहे. सीमेवरील प्रत्येक घडामोडीवर सरकारचे लक्ष आहे. जालंधर, पठाणकोट, जम्मू, श्रीनगर, अमृतसर, अवंतीपुरा, आदमपूर, भुज, बठिंडा, लुधियाना, या शहरांवर पाकचा हल्ला करण्याचा प्रयत्न होता, जो भारताकडून हाणून पाडण्यात आला. गुजरात, राजस्तानमध्येही हल्लाचा प्रयत्न झाला. संबंधित ठिकाणावरून ड्रोन आणि क्षेपणास्त्रे केली जप्त केली आहेत.
 
पाकिस्तानकडून सीमावर्तीय भागांमध्ये नागरिकांना लक्ष्य  केले जात आहे. भारताकडून पाकिस्तानच्या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिले जात आहे. पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये तब्बल १६ नागरिकांचा जीव गेलाय. भारताने या हल्ल्याला उत्तर दिले. मुळात म्हणजे पहलगामवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानाकडून सातत्याने गोळीबार केला जात आहे. पहलागमवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानच्या विरोधात कडक पाऊले उचलली गेली. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हे पाकिस्तानमधून आल्याचे स्पष्ट झाले.
 
गुजरात, राजस्तान आणि पंजाबमधील काही शहरांना पाकिस्तानकडून लक्ष्य केले जात आहे. भारताने पाकिस्तानचे लाहोरची 'एअर डिफेन्स सिस्टिम' उद्ध्वस्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा विदेश दाैरा या सर्व पार्श्वभूमीवर रद्द केला. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे सीमेवरील प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे कंबरडे चांगलेच मोडल्याचे बघायला मिळाले. ऑपरेशन 'सिंदूर'नंतर काही व्हिडीओ आणि फोटो समाजमाध्यमांवर आले. भारताने दहशतवाद्याचे तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले. 
 
रावळपिंडीत ड्रोन हल्ल्यात स्टेडियम हादरले
 
भारताने सलग दुसऱ्या दिवशीही ऑपरेशन सिंदूर सुरुच ठेवले आणि पाकिस्तानला एका मागून एक दुसऱ्या दिवशीही धक्के दिले. भारताने गुरुवारी ड्रोन हल्ले केले आणि त्यामध्ये रावळपिंडी शहराचे आता मोठे नुकसान झाले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सध्या पाकिस्तान सुपर लीगचे सामने सुरु होते, पण आता भारताच्या या हल्ल्यामध्ये रावळिपिंडीच्या स्टेडियमलाही हादरा बसला आहे. त्यामुळे या स्टेडियममध्ये आता सामने होऊ शकत नाहीत, हे स्पष्ट झाले. त्यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेटला हा सर्वात मोठा धक्का असल्याचे म्हटले जाते.
 
रावळपिंडीच्या स्टेडियममध्ये गुरुवारी पेशावर आणि कराची यांच्यातील सामना होणार होता. हा सामना रात्री ८.०० वाजता सुरू होणार होता. पण त्यापूर्वीच रावळपिंडी येथे हल्ला झाला आणि जीव वाचवण्यासाठी खेळाडूंना तिथून पळ काढाला लागला. या हल्ल्याची तीव्रता एवढी होती की, तेथील सुरक्षा यंत्रणा कमालीची हादरली आहे. त्यामुळेच त्यांनी सर्व खेळाडूंचा जीव वाचवण्यासाठी त्यांना अन्यत्र हलवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता यापुढे रावळपिंडी येथे पीएसएलचे सामने होणार नसल्याचे समोर आले. कारण यावेळी स्टेडियमधली रेस्टाॅरंटच्या भागाचे प्रचंड नुकसान झाले. ते उभारण्यासाठी बराच कालावधी लागेल. पण सध्याच्या घडीला तरी रावळपिंडी स्टेडियममध्ये कोणालाच प्रवेश दिला जाणार नसल्याचे आता स्पष्ट करण्यात आले.
 
भारताने गुरुवारी पाकिस्तानवर ड्रोन हल्ले करत त्यांना पुन्हा एकदा हादरवले आहे. या हल्ल्यात भारताने पाकिस्तानमधील महत्वाच्या ठिकाणी हल्ले केले आणि त्यामुळे पाकिस्तानला आता चांगलीच अद्दल घडवली आहे.भारताने रावळपिंडी येथे हल्ला केला आणि त्यामध्ये रावळपिंडीच्या स्टेडियमचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे हे नुकसान जोपर्यंत भरुन निघत नाही तोपर्यंत येथे सामने खेळवले जाणार नाहीत. 

Related Articles